संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा सांगली जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप करत आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी बँकेवर चाबूक मोर्चा काढला. सांगली जिल्हा बँकेतून बोगस कर्ज वाटप केलेल्या कर्जदार संस्था व संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, बोगस दाखल्यांच्या आधारे भरती झालेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता परस्पर वापरण्यात येत आहे त्याची सखोल चौकशी करावी, नवीन भरती प्रक्रियेला मान्यता देऊ नये आणि बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करावे, प्रशासक नेमण्याची मागणी यावी करण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँके प्रशासनाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. बेसुमार कर्जे वेगळ्या संस्थांना देणे आणि ती बुडवणे असा गोरख धंदा बँकेकडून सुरू झाला आहे. बँकेकडून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेचे आजी आणि माजी संचालक मंडळ तातडीने बरखास्त करण्यात यावे आणि गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जोर धरत आहे.
तहसिल कार्यालयातील शिपायास लाच घेताना अटक, एसीबीने सापळा रचत घेतले ताब्यात
बँकेत भ्रष्टाचार फोफावला असल्याचा आरोप करत आमदार गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा काढला आहे. यावेळी शेतकरी आणि बँकेचे ठेवीदार मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

यादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी बँक प्रशासनाला फैलावर घेतले. ते म्हणाले, ‘तसेच विनाकारण कोणत्याही अटीखाली अनेकांना कर्जाचे वाटप केले जात असून शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. बँकेत काय सुरू आहे हे जयंत पाटलांना माहित नाही का? बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकर भरती करण्यात आली आहे. ज्यामध्ये देखील मोठा गैरव्यवहार आहे. त्यामुळे नव्याने ४०० पदांच्या भरतीचा घातलेला घाट तात्काळ रद्द करावा.’
Unemployment In India : 18 लाख कारखाने बंद पडले, 54 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धक्कादायक अहवाल आला समोर
‘जिल्हा बँकेला पाठीशी घालणाऱ्या काही मस्त व लोकांच्या विरोधात भूमिका घेतल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही. एमडीने जिल्हा बँकेत मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यांचे बुटाने केस काढले जातील.’ असा सज्जड दम भरत ‘वसंत दादा कारखाना आणि जत मधील कारखान्यांना दिलेल्या कर्जाची चौकशी होऊन शेतकऱ्यांना देखील बँकेत मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे तसेच जिल्हा बँकेच्या २१६ शाखेत काय घडत आहे याची चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी देखील पडळकरांनी केली आहे.

सदाभाऊ यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी बँकेकडे येणार म्हटल्यावर कर्तव्यदक्ष सहकार मंत्र्याने पुण्यामध्ये बैठक बोलावून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्रशासनास पत्र देऊन टाकलं. शेतकरी उपाशी असून संचालक मंडळ मात्र तुपाशी असल्याचं दिसून येतं. शरद पवार यांचा राजकारणातील उदय आणि सहकाराचा अस्त आता एकाचवेळी सुरू झाला आहे.

चाबूक मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर पडळकर आणि खोत यांनी निशाणा साधला आहे. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सहकारी संस्थांचे थडगे बनवले आहे. ते थडगे आता संपुष्टात आणले पाहिजेत. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यानंतर शरद पवार सहकारात आले पण शरदचंद्र पवार हे चंद्र नसून एक का रात्र भरून ते लुटारू आले आहेत. आमदारकी असताना देखील जिल्हा बँक संचालकपद कशाला हवे?’ असे म्हणत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी वेळ पडली तर मंत्रालयावर देखील मोर्चा काढणार असल्याचा इशारा पडळकर आणि खोत यांनी दिला आहे.