श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, निलेश राणे खवळले, ही भाषा एका नेत्याला शोभत नाही…

मुंबई : भाजपच्या चारशे पारच्या नाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकांवर नकारात्मक परिणाम झाला, अशी स्पष्ट आणि सडेतोड भूमिका अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. भुजबळांच्या या मतावरुन माजी खासदार आणि नारायण राणेंचं सुपुत्र निलेश राणे चांगलेच खवळल्याचे दिसत आहे. श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? असा प्रश्न निलेश राणे यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन विचारला आहे. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे.

निलेश राणे काय म्हणतात?

श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे,
मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं??? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकरांवर कारवाई अटळ? लोकसभेच्या निकालाआधीच शिंदे ‘निक्काल’ लावणार!

छगन भुजबळ काय म्हणाले?

भाजपच्या चारसौ पारच्या नाऱ्याचा निवडणुकीत महायुतीवर फार मोठा नकारात्मक परिणाम झाला. दलितांमध्ये सरकार संविधान बदलणार असल्याचा संदेश गेला. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले.
P N Patil Death : काँग्रेसचा बडा नेता हरपला, कोल्हापूरचे युवा नेते ऋतुराज पाटील यांचा मोठा निर्णय, यावर्षी मी…Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

आपल्याला महायुतीमध्ये योग्य तो वाटा मिळायला पाहिजे. आपण आलो, त्यावेळीही त्यांनी आपल्याला सांगितलं की विधानसभेला ८० ते ९० जागा मिळतील, या वेळेला (लोकसभा) जी काय खटपट झाली, ती पाहता पुढे ही खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत, हे आधीच आपल्याला त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५० ते ६० निवडून येणार हो. ५० च घ्यायच्या… मग त्यातल्या काही गळाल्या की आम्ही आणखी खाली येणार. तसं होताच कामा नये, त्यामुळे आताच त्यांना सांगून टाकावं, आमचा वाटा आम्हाला मिळायला हवा, असं छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत म्हणाले होते.