शिंदे सूरतला निघाले, तेव्हा तुम्ही फडणवीसांना फोन केलेला का? ‘पळा पळा’ म्हणत ठाकरेंचं उत्तर

मुंबई: शिवसेनेनं २ वर्षांपूर्वी ऐतिहासिक बंड अनुभवलं. राज्यातलं ठाकरे सरकार कोसळलं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर असताना सेनेत सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजप, शिंदेसेनंच सरकार राज्यात आलं. दोन वर्षांपू्र्वी झालेल्या बंडाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच खळबळजनक दावे केले. बंड झालं त्यावेळी ठाकरेंनी फोन केला आणि मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असे दावे शिंदे आणि फडणवीस यांनी केले होते. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

मधल्या काळात दोन-तीन राजकीय स्फोट झाले. त्यातला पहिला स्फोट म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी जेव्हा फुटून सूरतला जात होती, तेव्हा तुम्ही फडणवीसांना फोन करुन सांगितलं होतं की तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा. फडणवीसांनी असा दावा केला होता, ते खरं आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर पळा… पळा… लवकर पळा… कोण पुढे पळे तो पाहू…, असं म्हणत ठाकरेंनी उत्तर दिलं.
आधी मुख्यमंत्री, मग उपमुख्यमंत्री; फडणवीसांसाठी पुढचा प्लान काय? मोदींनी सांगितली ‘जबाबदारी’
फडणवीसांना फोन केला होता, असा प्रश्न ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी ठाकरेंना विचारला. त्यावर शक्यच नाही. या सगळ्या भाकड कथा आहेत, असं ठाकरे म्हणाले. मला नासलेले आंबे माझ्या निष्ठावंतांच्या पेटीत ठेवायचे नव्हते. नाही तर त्यांच्या शेपट्या धरुन त्यांनाही मी पकडून ठेवू शकलो असतो. पण असले पळणारे उंदीर माझ्या काय कामाचे?, असा सवाल ठाकरेंनी विचारला.
भाजपनं मला हिंदुत्त्व शिकवावं? मुस्लीम लीग, मुखर्जी, फझलूल हक; उद्धव ठाकरेंनी सगळंच काढलं
ठाकरे कुटुंबाशी असलेल्या संबंधांचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. उद्धव ठाकरे अडचणीत असतील तर त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा पहिला माणूस मी असेन, असं मोदी म्हणाले. हे नेमकं काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर हा संभ्रम मोदींच्या मनात का व्हावा ते मला कळत नाही. कारण मोदी पुढे असंही म्हणाले होते की जेव्हा माझं ऑपरेशन झालं तेव्हा त्यांनी माझ्या कुटुंबियांना फोन केले होते. त्यावेळी माझ्या हालचाली पूर्णपणे थांबल्या होत्या. त्यांनी किती फोन केले, किती वेला केले, का केले, ते फोन मला रेकॉर्ड करण्याची गरज नाही. खरं-खोटं लोकांना माहिती आहे, असं ठाकरे म्हणाले.

मोदींचं माझ्यावर एवढं प्रेम होतं तर मग त्याच काळामध्ये तुमचे चेलेचपाटे रात्रीचे हुडी वगैरे घालून माझ्या गद्दारांबरोबर माझं सरकार खाली खेचायचा प्रयत्न का करत होते? हे तुमच्या परवानगीशिवाय करत होते का? असे प्रश्न ठाकरेंनी मोदींना विचारले. ज्या शिवसेनेनं, ज्या हिंदुहृदयसम्राटांच्या मुलानं तुम्हाला दोन वेळा पाठिंबा दिला, तुमचा प्रचार केला, त्याला तुम्ही नकली म्हणायला लागलात? हे कोणतं प्रेम? हे चायनीज प्रेम आहे का? प्रेमाची व्याख्या तरी काय तुमची?, असे सवाल ठाकरेंनी उपस्थित केले.