शरद पवारांनी जिथून ‘विजयी’ तुतारी फुंकली, तिथेच तटकरेंचं पाऊल, राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा

मुंबई : ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे.लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची आणि आमदारांची बैठक घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात भरघोस यश मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती.

ज्या शरद पवार यांच्यासमोर अजितदादांनी बंडाचे निशाण नाचवले, त्याच शरद पवार यांनी सहा दशकांचा अनुभव पणाला लावत लोकसभा निवडणुकीत अजितदादांना अस्मान दाखवले. शरद पवार यांचे राजकीय डाव समजत नाहीत, अशी राजकीय क्षेत्रात वदंता आहे. आता तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अशा सगळीकडच्याच जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला; त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांमध्ये घबराट पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेच्या तोंडावर आमदारांनी वेगळा निर्णय घेऊ नये तथापि पक्षाचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तटकरे महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत.
Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले; आता विधानसभेत…

लोकसभेला कमी खासदार आले असले तरी विधानसभेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कंबर कसली आहे. या राज्यव्यापी दौऱ्यातून पक्षाची दिशा आणि भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे स्पष्ट करणार आहेत.
अजितदादांच्या निर्णयांना जनतेपर्यंत पोहोचवा, बोलघेवड्यांना उत्तर देण्यात वेळ दवडू नका, तटकरेंची प्रवक्त्यांना सूचना

अहमदनगर उत्तरेतून तटकरेंचे डॅमेस कंट्रोल सुरू होणार, सहा सीट लक्ष्य

दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान अहमदनगर शहर, अहमदनगर दक्षिण ग्रामीण, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर, नेवासा या अहमदनगर उत्तरेतील विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे घेणार आहेत.

दादांच्या आमदारांच्या मनात चलबिचल, ‘पुढे काय?’ चिंतेचे सावट

महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’चे दोन रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन मागील आठवड्यात पार पडले. नगर येथे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सोहळ्याला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या तुफान यशाची झालर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता, तर मुंबईत षण्मुखानंद सभागृहात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘पुढे काय?’ या प्रश्नाच्या चिंतेचे सावट स्पष्ट दिसत होते.