विधानसभेलाही विरोधक फेक नरेटिव्ह मांडतील, प्रत्युत्तर द्या; संघाचा भाजपला सल्ला

प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी निर्माण केलेल्या कथनाचा (नरेटिव्ह) भारतीय जनता पक्ष व महायुतीला फटका बसला. त्याला योग्य प्रत्युत्तर देता आले नाही. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा कथनावरच भर असेल. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना देत पराभवाची कारणमीमांसा केल्याचे समजते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवारातील संघटनांची पश्चिम प्रांत बैठक सोमवारी मोतीबागेत पार पडली. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, प्रा. राम शिंदे, माजी आमदार बाळा भेगडे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, योगेश टिळेकर यांच्यासह संघाचे सह सरकार्यवाह अतुल लिमये यांच्यासह प्रांताचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : उद्धव ठाकरे आदित्य यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले तर…सुधीर मुनगंटीवार यांचं मिश्कील उत्तर
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला आलेल्या अपयशाचा आढावा घेतानाच आगामी निवडणुकांना कसे सामोरे जायचे, याविषयीही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत उपस्थित काही राजकीय नेत्यांशी पदाधिकाऱ्यांची वैयक्तिक चर्चा झाल्याचेही कळते. संघ परिवारातील जनसंघटना श्रेणीतील भाजप, अभाविप, मजदूर संघ आदींच्या नियमित आढाव्यासाठीची ही पूर्वनियोजित बैठक होती. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व परिवारातील संस्थांतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचा आढावा व नियोजन यावर या बैठकीत चर्चा झाली, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मृत्यूची खोटी बातमी, ‘न्यूज विथ कोमल’वर गुन्हा, यूट्यूब चालकाच्या अटकेची मागणी

‘महायुती अभेद्य’

‘राज्यातील महायुती अभेद्य असून, आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून जात, द्वेष आणि चुकीची माहिती आणि प्रचार केल्याचे दिसून आले. पराभवाचे दोषारोप कोणावरही निश्चित न करता विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देऊ,’ असे प्रा. राम शिंदे म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

‘संभ्रम दूर करावा’

राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही मराठा समाजाचे आंदोलन पुन्हा सुरू झाले आहे. ओबीसी, भटके-विमुक्त समाजानेही उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओबीसी समाजाबाबत योग्य ती भूमिका घेत संभ्रम दूर करावा,’ असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.