विधानपरिषदेसाठी भाजपची चाचपणी; पंकजा-दानवेंची नावं शर्यतीत, हर्षवर्धन-चित्रा वाघही स्पर्धेत

प्रतिनिधी, नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी पुढील महिन्यात (१२ जुलै) होणाऱ्या निवडणुकीत भाजपने चार ते पाच जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. यात लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले रावसाहेब दानवे आणि डॉ. भारती पवार यांच्या व्यतिरिक्त पक्षनेत्या पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांच्याही नावांचा समावेश आहे. यातील दानवे, मुंडे व डॉ. पवार या तिघांपैकी एकाला राज्यसभेत रिक्त झालेल्या जागेवरही संधी मिळू शकते.

१२ संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत

दिल्लीतील पक्षनेतृत्वाशी राज्याच्या भाजप नेतृत्वाने नुकतीच चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी असलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. विधान परिषदेचे ११ सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत.
Sanjay Raut : बिनचेहऱ्याची मविआ अजिबात नको, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हवाच, राऊतांचे ठाकरेंकडे अप्रत्यक्ष बोट
या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, विधान परिषदेवर कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता भाजपमध्ये आहे. विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी, २५ जूनपासून २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. ५ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १२ जुलै रोजी रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.
Chandrakant Patil : अजितदादांवर चिडून कॅबिनेट बैठकीतून काढता पाय? चंद्रकांत पाटील म्हणतात अर्थ विभागाने म्हणे…

कोणाकोणाची नावं चर्चेत?

विधानसभा निवडणुकांपूर्वी विधान परिषदेत संधी देऊन जातीय समीकरणे जुळवण्याची भाजपची धडपड आहे. त्या आधारे जी अन्य नावे विधान परिषदेसाठी चर्चेत आहेत त्यात हर्षवर्धन पाटील, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळे, निलय नाईक, चित्रा वाघ व माधवी नाईक आदींचा समावेश आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

महाविकास आघाडीकडून धक्क्याचे संकेत

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याची रणनीती मविआतील नेत्यांनी आखल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. रिक्त जागांपैकी महायुतीकडे नऊ, तर महाविकास आघाडी दोन जागा निवडून आणण्याचे संख्याबळ आहे. परंतु त्यांच्याकडून तिसरा उमेदवार उतरवून गुप्त मतदानाचा फायदा उचलला जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो.