मोदींना शिवरायांचा जिरेटोप, सोशल मीडियावरील संतापानंतर पटेल नरमले, म्हणाले, यापुढे काळजी घेऊ

पालघर : अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवल्यानंतर शिवरायांसह त्यांना मानणाऱ्या कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान झाल्याच्या भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पटेलांवर सडकून टीका केल्यानंतर अखेर प्रफुल्ल पटेल यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ, अशी ग्वाही प्रफुल्ल पटेल यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन दिली आहे.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ.
Devendra Fadnavis : यामिनी जाधव, वायकरांवर आरोप केले, आता त्यांच्यासाठी मतं कशी मागणार? फडणवीसांनी थिअरी सांगितली
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मोदींच्या डोक्यावर जिरेटोप

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात, १ जून रोजी वाराणसीसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. मंगळवारी त्यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी एनडीएतील सर्व घटकपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप भेट म्हणून दिला. याचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर समाज माध्यमांवर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
Rais Shaikh : उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व मान्य आहे? ‘मशाली’साठी राबणारे मराठी मुस्लीम रईस शेख म्हणतात…

उद्धव ठाकरे यांची टीका

‘प्रफुल्ल भाई लाचारी किती करावी? तुम्ही त्यांना टोप्या घाला, दुसऱ्या कोणत्याही घाला, पण महाराजांचा जिरेटोप ज्यांच्या डोक्यावर ठेवताय, ते डोकं कसं आहे ते तपासा, अशा शब्दता उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल चढवला. प्रफुल्लभाई हा तुम्ही महाराजांचा अपमान करताय, तुम्ही लाचार झालात, मोदींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची शान घालवताय. मोदींनी असं महाराष्ट्रासाठी केलंय तरी काय?’ असा सवाल देखील ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.