मोदींना फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता, मत मागायला इकडे येऊ नका: कोल्हे

प्रशांत श्रीमंदिलकर, शिरूर, पुणे : महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संख्येने कमी आहे. तरी केंद्र सरकारने गुजरातच्या २ हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली. सरकारच्या याच निर्णयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी जदार टीका केली आहे.मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता असल्याचे या निर्णयाने दाखवून दिले आहे. त्यामुळे मत मागायला गुजरातलाच जा, इकडे येऊच नका, अशा खणखणीत शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातीच्या धोरणावरून मोदी सरकारवर थेट हल्ला केला.
शिरुरमधून भुजबळांना तिकीट देण्याचं शिंदेंच्या मनात, नकारामुळे आढळराव उमेदवार, कोल्हेंचा दावा

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, शेखर पाचुंदकर, स्वप्नील गायकवाड,दामु घोडे, शंकर जांभळकर आदी उपस्थित होते.
घर कोणाचं, संसार कोणाचा, दारावर पाटी कोणाची? असा हा उमेदवार, कोल्हेंची आढळराव पाटलांवर टीका

मत मागायला तिकडेच जा, इकडे येऊच नका!

डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, तुमच्या कांद्याची माती होती. तुमच्या ताटात माती कालवली जाती, याच्याशी मोदी सरकारला काही देणेघेणे नाही. हे आजच्या निर्णयावरून मोदी सरकारने दाखवून दिलं आहे.

जर मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असेल तर आपण पण त्यांना सांगू शकतो मत मागायला तिकडेच जा. इकडे येऊच नका. असं सांगत भाजपच्या या निर्णयाला डॉ. कोल्हे यांनी कडाडून विरोध केला.
आढळराव पाटलांचा फॉर्म भरायला मुख्यमंत्री नाही, मी पहिल्यापासून सांगतोय ते डमी उमेदवार : अमोल कोल्हे

आढळरावांची कोल्हेंवर टीका

‘निवडणूक जवळ आली म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शेतीमालाला भाव मिळत नसल्याची आठवण झाली आहे. पाच वर्षे चित्रीकरणात व्यस्त असलेल्या कोल्हेंना निवडणुकीमुळे शेतकऱ्यांचा अचानक कळवळा आला आहे, अशी टीका करतानाच साडेचार वर्षे कांद्याला भाव होता का, शेतकरी सुखात होता,’ असे वक्तव्य शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. साडेचार वर्षे कांद्याला भाव नव्हता, अशी कबुली आढळरावांनी दिल्याची चर्चा रंगली आहे. ‘मी केलेल्या कामावर स्वत:च्या नावाचा शिक्का मारून प्रचार केला जात आहे,’ अशी टीका त्यांनी केली. वैयक्तिक टीकेमुळे देशाच्या विकासाच्या मुद्द्यापासून आपण फारकत घेत आहोत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

अमोल कोल्हेंचा आग्रह असले तर मी आणखी चार निवडणुका लढेन; आढळरावांचा टोला

पाच वर्षांपूर्वी एकाला निवडून दिल्याच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांच्या व्यथा मी आता ऐकत आहे. अडचणीत धावून जावे, दोन शब्द प्रेमाने बोलावे, जमले तर विकास करावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. हे महाशय मात्र पाच वर्षे फिरकले नाही, असे आढळराव म्हणाले.