मोदींना आठ टक्के मुस्लिमांचं मतदान, राज्यघटना बदलणार नाहीत, रामदास आठवलेंना विश्वास

मुंबई :‘नरेंद्र मोदी यांना आठ टक्के मुस्लिमांनी मतदान केलेले आहे. सर्व समाजघटकांची साथ लाभल्यानेच भाजपला इतका प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे मोदी हे राज्यघटना बदलण्याची भूमिका घेणार नाहीत’, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी दिली. धार्मिक आधारावर कधीही आरक्षण मिळू शकत नाही, पण मुस्लिमांना ओबीसीमधून आधीच आरक्षण मिळालेले आहे, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. त्याचवेळी संपूर्ण मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करत असून, त्यातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो, अशी भावना तयार झाल्यानेच मोदी प्रचारात तसे बोलत असल्याचे आठवले म्हणाले.

‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘मटा कट्टा’ कार्यक्रमात रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्य, मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर थेट भूमिका मांडली. ‘ऐंशीच्या दशकात भाजपच्या केवळ दोन जागा होत्या. परंतु, २०१४ पासून नरेंद्र मोदी यांनी सातत्याने ‘सबका साथ, सबका विश्वास’ ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच सर्व समाजघटका त्यांच्यासोबत आले. त्यामुळेच देशाच्या इतिहासात प्रथमच ओबीसी व्यक्ती पंतप्रधान झाली’, असे आठवले म्हणाले.
Amit Shah : भाजपात निवृत्ती वय ७५? सप्टेंबर २०२५ मध्ये तुम्ही पंतप्रधान? अमित शाह म्हणाले, वेगळ्या परिस्थितीत…
दलितांबरोबरच मुस्लिम समाजानेही मोदींना साथ दिली असून, मुस्लिम समाजाकडून आठ टक्के मतदान त्यांना मिळालेले आहे, हे विसरता येणार नाही, याकडे आठवले यांनी लक्ष वेधले. तसेच केंद्राच्या सर्व योजना कुठलाही धार्मिक भेदभाव न करता मुस्लिमांनाही मिळत आहेत, यावर त्यांनी जोर दिला.

मुस्लिमांना ओबीसीमधून आधीच आरक्षण आणि त्याचे लाभ मिळत असून, त्यांना वेगळे आरक्षण देण्याची गरज नसल्याचे मत आठवले यांनी मांडले. काकासाहेब कालेलकर समितीने समाजातील मागास जातींचा अभ्यास केला आणि त्यातून मुस्लिमांमधील इतर मागासवर्गीय जमातींचा समावेश ओबीसींमध्ये केला. मात्र, काँग्रेसने मुस्लिमांना सरसकट वेगळे आरक्षण देण्याचा डाव आखला असून तो यशस्वी होणार नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray : मनसेने शिवाजी पार्क राखलं, उद्धव ठाकरेंना कुठलं मैदान? अखेर १७ मेच्या सांगता सभेचं ठिकाण ठरलंRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

दरम्यान, सर्व समाजाला समान वागणूक देणारे संविधान कुणीही बदलू शकत नाही. तसेच भाजपमधील ज्या व्यक्तीने राज्यघटना बदलण्याची जाहीर भूमिका घेतली त्याचे तिकीट कापले गेले आहे. राज्यघटना बदलली जाणार नाही, असे मोदींनीही आधीच स्पष्ट केले आहे, याकडेही आठवले यांनी लक्ष वेधले.