मोठ्या समाजाला दुखावून चालत नाही, दादा आपल्याला सामाजिक अभिसरणाची गरज : भुजबळ

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला मोठी ठेच लागली आहे. केवळ महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला असे नाही तर देशात एनडीएच्या अनेक उमेदवारांना पराभव पाहावे लागले. दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजाला दुखवून चालत नाही, हे आता त्यांना (भाजपला) कळाले असेल. मोठे समाज आपल्यापासून दुरावले की काय होते हे देखील त्यांना चांगलेच उमगले असेल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला कमबॅक करायचे असेल तर सामाजिक अभिसरणाची मोहिम हाती घ्यायला हवी. सगळ्या समाज घटकांना सोबत घ्यायलाच हवे, प्रसंगी त्यांना मोठी ताकद देऊन आम्ही तुमच्यामागे खंबीरपणे उभे आहोत, हे दाखवून द्यावे लागेल, असे सांगून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपच्या डोळ्यात अंजन तर घातलेच शिवाय भाजपसोबत असलेल्या पक्षनेतृत्वाला (अजित पवार) वास्तवाची जाणीवही करून दिली.अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे साजरा होत आहे. या सोहळ्याला पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अनिल पाटील, मंत्री आदिती तटकरे, मंत्री संजय बनसोडे आदी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीला NDA सरकारमध्ये मंत्रिपद नाही? फडणवीस तटकरेंच्या बंगल्यावर, वेगवान घडामोडी सुरु

म्हणूनच आपल्या मतदारांनी आपली साथ सोडली…!

इंडिया आघाडीकडून जाणीवपूर्वक मुस्लिम, दलित आणि आदिवासी बांधवांची दिशाभूल करण्यासाठी अपप्रचार करण्यात आला. भाजपची ‘चारसौ पार’ ही घोषणा संविधान बदल करण्यासाठी दिली गेली, हे विरोधकांनी जनतेच्या मनावर बिंबवले, हे मी पिंपळगावच्या सभेत मोदींनाही म्हणालो, असे भुजबळ यांनी आवर्जून सांगितले. तसेच भाजपने देखील मुस्लीम ‘हे करतील- ते करतील’ अशी विधाने प्रचारांत केली. संविधान बदलणार म्हणजे आपले आरक्षण जाणार हे आदिवासींना वाटल्याने त्यांनीही महायुतीची साथ सोडली. मोठे समाज ज्यावेळी निवडणूक काळात दुरावतात त्यावेळी काय होते, हे आता त्यांना कळाले असेल. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दुरावलेले समाज पुन्हा आपल्यासोबत यावेत, यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतील, असे भुजबळ म्हणाले.
Eknath Shinde : डॅमेज कंट्रोलसाठी शिंदे सरकारचा नामी फंडा, प्रभावहीन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी

भाजपच्या दबावाला बळी पडू नका

आपल्यासमोर आता विधानसभेची निवडणूक आहे म्हणजेच या निवडणुकीत आता संविधान बदलाचा विषय येत नाही. मुस्लिम, दलित आदिवासी, ओबीसी, भटके हे आपले दुरावलेले मतदार आपल्याकडे पुन्हा कसे येतील, यासाठी गांभीर्याने काम करावे लागेल. आपण भाजपसोबत बसणार आहोत. त्यांना काही गोष्टी रुचतील, काही खटकतील पण म्हणून आपण त्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये, तरच आपले मतदार आपल्यापासून दुरावणार नाहीत, असेही निक्षून भुजबळ यांनी सांगितले.
Yogesh Kadam : शिवसैनिकांना घड्याळाला मत द्यायचं नाही, दापोलीतील गितेंच्या लीडचं योगेश कदमांकडून स्पष्टीकरण

दलित-मुस्लिमांना आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास द्यावा लागेल

निवडणुकीचे राजकारण करताना सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन चालले पाहिजे. जिथे अल्पसंख्याकाची शक्ती असेल तिथे त्यांचा विचारही व्हायला हवा. मुस्लिम जर भुजबळांना मत देत असतील तर मी देखील धर्म वगैरे काहीही मनात न ठेवता त्यांना मदत केलीच पाहिजे. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास त्यांना आपल्यावा द्यावा लागेल, त्यासाठी हवे तर समित्या वगैरे नेमा पण सामाजिक अभिसरण झालेच पाहिजे, असे अधिकारवाणीने भुजबळ यांनी सांगितले.

“न हरूँगा हौसला उम्रभर, ये मैने खुदसे वादा किया हैं”

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मला भाषणाची संधी फार कमी मिळाली. काहींना वाटायचे याला बोलावले तर आपली मते जातील. काहींनी तर बॅनरवर फोटोही लावला नाही. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. जायची ती मते गेलीच. पण अशांना सांगतो “न हरूँगा हौसला उम्रभर, ये मैने खुदसे वादा किया हैं” अशी शेरोशायरी करून त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना तसेच प्रतिस्पर्ध्यांना इशारे देऊन पुढील इरादे स्पष्ट केले.