महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य, अटल सेतूवरील आरोपांवर उत्तर देत मुंबईत मोदी काय म्हणाले?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशात नोकऱ्या निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कामाचा दाखला देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पीएम मोदी म्हणाले, “अलिकडेच आरबीआयने नोकऱ्यांबाबत एक अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, गेल्या ३ ते ४ वर्षांत देशात सुमारे ८ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. या आकडेवारीने खोटेपणा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली आहे. हे लोक (विरोधक) गुंतवणुकीला, पायाभूत सुविधांना आणि देशाच्या विकासाला विरोध केला आणि आता ते उघड होत आहे.
Jayant Patil : माकपचे मत फुटूच कसे शकते? विश्वास ठेवणे कठीण, अनेकांना धक्का, शेकापच्या नेत्यांकडून चिंता व्यक्त, बैठकीत काय घडले?
मुबंईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळ पंतप्रधान बोलत होते. पीएम मोदी म्हणाले, “एनडीए सरकारचे विकास मॉडेल वंचितांना प्राधान्य देण्याचे आहे. आम्ही अनेक दशकांपासून शेवटच्या रांगेत असलेल्यांना प्राधान्य देत आहोत. नवीन सरकारने शपथ घेताच, आम्ही कायमस्वरूपी घरे आणि शेतकऱ्यांशी संबंधित मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारही त्याच बांधिलकीने काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने दरवर्षी १० लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे, याचा मला आनंद आहे. पर्यटन, कृषी आणि उद्योग हे जेव्हा चांगली कनेक्टिव्हिटी असते तेव्हा याचा फायदा होतो.

अटल पुलाला झालेल्या तडावरुन काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला होता. यावर पीएम मोदी म्हणाले, “मुंबईतील लोकांचे जीवनमान सुधारणे हे आमचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे मुंबईच्या सभोवतालची कनेक्टिव्हिटी सुधारली जात आहे. मुंबईत कोस्टल रोड आणि अटल सेतूचे काम पूर्ण झाले आहे आणि तुमच्या लक्षात येईल की अटल सेतूबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली. महाराष्ट्र हे असे राज्य आहे जे भारताला विकसित (आत्मनिर्भर) बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. महाराष्ट्रात उद्योग, कृषी आणि वित्त क्षेत्राची ताकद आहे आणि यामुळे मुंबई (भारताचे) आर्थिक केंद्र बनण्यास मदत झाली आहे. आता महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचे माझे ध्येय आहे.