मनसे यूटर्न घेणार? कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घ्या, फडणवीसांचे दूत राज ठाकरेंच्या मनधरणीला

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत मनसेसोबत संघर्ष टाळण्यासाठी भाजपने एक पाऊल पुढे टाकलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी त्यांचं ‘शिवतीर्थ’ हे निवासस्थान गाठलं आहे. प्रसाद लाड आणि विधानपरिषद निवडणुकीतील कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे राज ठाकरेंच्या भेटीला आल्याची माहिती आहे.

भाजपने एक पाऊल पुढे टाकलंय, ते मनसेने एक पाऊल मागे घ्यावं, यासाठी. कारण विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत पानसे यांना उमेदवारी खूप आधीच जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर भाजपनेही ठाम भूमिका घेत आपल्या हक्काची जागा आपणच लढवणार असल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे लोकसभेला ‘बिनशर्त’ पाठिंबा देणाऱ्या मनसेसोबत भाजपचा सामना रंगणं अटळ मानलं जात होतं. मात्र आता लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपने मनसेला पानसेंची उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे.
Ashish Shelar : मर्दश्री. आशिषजी शेलार, शब्दाला जागा, राजकारण सोडा; ठाकरेंच्या ‘शिंदें’चे शेलारांना चिमटे
देवेंद्र फडणवीस यांचा संदेश घेऊन त्यांचे खास नेते आणि आमदार प्रसाद लाड, तसेच विधानपरिषद निवडणुकीतील कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार असलेले निरंजन डावखरे खुद्द राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतीर्थ’वर पोहोचले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
Devendra Fadnavis : संघाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांशी भेट, फडणवीस दिल्लीला; RSS ची ‘गरज नसणाऱ्या’ नड्डांसाठी संदेश?Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

राज ठाकरेंनी आधीच उमेदवार घोषित करुन भाजपच्या मनात काय चाललं आहे, याची चाचपणी केल्याची चर्चा होती. आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या जागावाटपाचा कुठलाच अधिकृत करार झालेला नसताना, आपला मित्र आपल्या मदतीला येणार का, हे राज ठाकरे पडताळून पाहत असावेत, असं बोललं जात होतं, पण ते फोल ठरल्याचं चित्र आहे.

खरं तर लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राज ठाकरे यांना हिरीरीने सहभागी करुन घेतल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघातील एका जागेसाठी तरी भाजप मनसेला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात होती. कारण राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या रत्नागिरी, पुणे या भाजपच्या जागांसह ठाणे, कल्याण येथील महायुतीचे उमेदवारही निवडून आले. परंतु भाजपने मनसेच्या अपेक्षांना सुरुंग लावत उमेदवारही दिला आणि आता त्यांनाच माघारही घ्यायला लावत आहेत.