बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठाला… राज ठाकरेंच्या भाषणावर शर्मिलांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवाजी पार्कच्या मैदानावर झालेल्या महायुतीच्या भव्य सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जनतेला संबोधित केलं. राम मंदिर, कलम ३७० आणि तीन तलाक असे धाडसी आपण निर्णय घेतलेत, त्याबद्दल अभिनंदन करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला. सभेनंतर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ‘बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठाला त्यांची जागा दाखवा’ असं आवाहन जनतेला केलं.

शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या?

राज ठाकरे यांनी खात्री बाळगली आहे की नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, त्यामुळे त्यांनी आधीच महाराष्ट्राच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. बाळासाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती, की मला जर काँग्रेससोबत जायला लागलं, तर मी माझा पक्ष बंद करेन, बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करा, अशी मतदारांना विनंती आहे. शिवसेना उबाठाला त्यांची जागा… (पॉझ) बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, यात आलं काय ते.. असं शर्मिला ठाकरे सूचकपणे म्हणाल्या.

लोकांनी लोकांच्या भल्याचं राज्य आणावं, राज ठाकरेंनी कशावरही टीका न करता, समाजाच्या गरजा व्यक्त केल्या. महाराष्ट्राचं भविष्य चांगलं आहे. गेल्या पाच वर्षातली मोदींची कामं पाहता, जनता त्यांना मतदान करेल, असा विश्वासही शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला.
Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, मात्र अजित पवार हे…

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

पंतप्रधान मोदींच्या २०१४-२०१९ च्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं, ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आतापर्यतचे बोलूया, असे सांगत मी आपल्यासमोर फक्त पुढच्या पाच वर्षांसाठी उभा असल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले.

‘राममंदिर साकारणारच नाही, असे वाटत होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी होते म्हणूनच राममंदिर उभे राहू शकले. ३७० कलम मोदी यांनी रद्द करून दाखवले. आज काश्मीर भारताचाच एक भाग आहे, हे सिद्ध झाले. आता तुम्ही तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल’, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी नमूद केले. दादरच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
Girish Mahajan : नाशकात दगाफटका झाला, तर माना खाली घालाव्या लागतील, गिरीश महाजनांची पदाधिकाऱ्यांना तंबीRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

‘राजीव गांधी पंतप्रधान होते, त्या काळात सर्वोच्च न्यायालयात शहाबानो या मुस्लिम महिलेच्या पोटगीचे प्रकरण होते. न्यायालयाने शहाबानो या महिलेच्या बाजूने निकाल दिला होता. राजीव गांधी यांनी बहुमताच्या आधारावर निकाल बदलला. पण मोदी यांनी तिहेरी तलाकचा कायदाच रद्द केला व तमाम मुस्लिम महिलांना न्याय दिला. हे सर्वांत धाडसी निर्णय होते. इतकी वर्षे जे झाले नाही ते करवून घेणे मला महत्त्वाचे वाटते’, असे राज ठाकरे म्हणाले. मराठा साम्राज्याचा विषय शालेय इतिहासात शिकवावा, गडकिल्ल्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरची समिती नेमावी आदी अपेक्षा राज यांनी व्यक्त केल्या.