बारामतीत राजकीय धमाका होणार? १४ जुलैला दादांकडून मोठ्या घोषणेची शक्यता, NCPच्या नेत्याचा गोप्यस्फोट

दीपक पडकर, बारामती : येत्या रविवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष शक्तिप्रदर्शन करणार आहे. तसेच जन सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभरातील विविध पदाधिकारी नवीन खासदार आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी होणार आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मात्र या मेळाव्यात मोठी घोषणा होणार असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे. याची चर्चा आता रंगत आहे.
‘संसदेत बंद करून राहुल गांधीच्या कानशिलात वाजवावी’, BJP आमदाराचे वादग्रस्त विधान, वातावरण तापणार?
येत्या रविवारी बारामतीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनसन्मान कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यासह देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी निमंत्रित करण्यात आले आहेत. याची माहिती देताना प्रदीप गारकर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. १४ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने गारटकर यांनी बारामतीमध्ये पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.रविवार १४ जुलैचा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करायचा या दृष्टीने यासाठी तयारी करण्यात आली आहे. दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे या कार्यक्रमात बारामतीमध्ये राजकारणातील सर्वात मोठी घोषणा होण्याची शक्यता गारटकर यांनी वर्तवली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी राजीनामा द्यायला लावला असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र यामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र तालुक्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवार यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला नाही. आता उपमुख्यमंत्री अजित पवार या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेणार का याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.