फ्लडगेज ठरवणार रेल्वे वाहतुकीची दिशा; पश्चिम रेल्वेवर ३६ पैकी २४ फ्लडगेजची उभारणी पूर्ण

मुंबई : मुसळधार पावसात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यास लोकल वाहतूक खोळंबते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात ३६ फ्लडगेज बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी २४ फ्लडगेजची उभारणी पूर्ण झाली असून उर्वरित फ्लडगेज येत्या आठवड्यात उभारण्यात येणार आहेत.

अत्यंत मुसळधार पाऊस आणि समुद्रात भरती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्यास शहरातील रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्याखाली जातात. रेल्वेमार्गावर पाणी आल्यास त्याची पातळी मोजण्यासाठी फ्लडगेजचा वापर होतो. फ्लडगेजमध्ये पाण्याचे विविध स्तर दर्शविलेले असतात. पाण्याची पातळी ठराविक स्तराच्या वर गेल्यास सुरक्षिततेचा उपाय म्हणून रेल्वे वाहतूक बंद करण्यात येते.
Mumbai Fire: मुंबईकर साखरझोपेत असताना धारावीत भीषण आग, ६ जण होरपळले, जिम जळून खाक

पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागात दादरमध्ये २० फ्लडगेज बसवण्यात येणार असून त्यापैकी ४० टक्के काम पूर्ण झाले असून आठ फ्लडगेज उभारण्यात आले आहेत. उर्वरित १२ ठिकाणी फ्लडगेजचे काम येत्या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. अंधेरी, बोरिवली आणि भाईंदरमधील फ्लडगेज उभारण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून तिन्ही स्थानकांच्या परिसरात एकूण १६ फ्लडगेज उभारण्यात आले आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे रुळांच्या वर १५० मिमी एवढ्या उंचीपर्यंत पुराच्या पाण्याची पातळी गेल्यास खबरदारी म्हणून सर्व रेल्वे वाहतूक थांबवण्यात येते. तर त्यापेक्षा कमी पाणी पातळी असेल, तर पातळीनुसार गाड्यांचा वेग निश्चित केला जातो.
नॅशनल पार्कात तीन बछड्यांचे आगमन, श्रीवल्ली अन् बाजीरावचा बछडा सुदृढ; आई-पिल्लांची योग्य काळजी

पाण्याची पातळी आणि खबरदारीच्या उपाययोजना

रेल्वे रुळांच्या वर १५० मिमी पाणी- सर्व रेल्वे वाहतूक थांबवण्यात येते.

रेल्वे रुळांवर १०० ते १५० मिमी पाणी – रेल्वेगाड्या ताशी १० किमी धावतात.

पाण्याची पातळी ७५ मिमीपर्यंत- ताशी ४० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावतात.

रेल्वे रुळांच्या खाली पाणी- सर्व लोकल, अन्य रेल्वेगाड्या निर्धारित वेगाने धावतात.
Maharashtra Water Level: राज्यातील पाणीपरिस्थिती चिंताजनक; धरणांमध्ये केवळ २३ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पश्चिम रेल्वेवरील फ्लडगेज

विभाग फ्लडगेज संख्या उभारलेले फ्लडगेज संख्या काम पूर्ण झाल्याची टक्केवारी

दादर २० ८ ४०

अंधेरी ५ ५ १००

बोरिवली ४ ४ १००

भाईंदर ७ ७ १००