पॉलिटिकल एजंट म्हणणं भोवणार? संजय राऊतांवर कठोर कारवाई करा, भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची मागणी

प्रतिनिधी, मुंबई : खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पॉलिटिकल एजंट असा उल्लेख करणे हा त्या संविधानिक पदाचा अपमान आहे. राऊत यांच्यावर विधिमंडळात हक्कभंग आणून गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच त्यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप गटनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. शिवसेनेच्या अधोगतीला सर्वस्वी संजय राऊत जबाबदार असून त्यांना उद्धव ठाकरेंनी बाजूला केले तरच शिवसेनेला उरले सुरले काहीतरी भविष्य राहील, नाहीतर पूर्णपणे संपुष्टात येईल, असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे.

संजय राऊतांकडून संविधानिक पदाचा अपमान

खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पॉलिटिकल एजंट असा उल्लेख करणे हा संविधानिक पदाचा अपमान आहे. राऊत यांच्यावर विधिमंडळात हक्कभंग आणून गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच त्यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
Dharavi Redevelopment : मोठी बातमी : धारावीची जमीन शासनाच्या खात्यांना हस्तांतरित करणार, अदानी समूह केवळ पुनर्विकास करणार
राज्यातील ४८ मतदारसंघात भाजपकडून निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक नेमले असून त्याविषयी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्या-त्या विधानसभेत काय करण्याची गरज आहे यावर उपाययोजना करण्यासाठी निरीक्षकांचा दौरा फायद्याचा ठरेल, असे दरेकर म्हणाले. तसेच ज्यांनी संघटनेत किंवा महायुतीत चुकीचे काम केलेय ते वरिष्ठांच्या निदर्शनास आणण्याचे काम यानिमित्ताने होईल. जर एखाद्याने पक्षविरोधी, महायुती विरोधात काम केले असेल तर त्याच्यावर कारवाईची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
Sanjay Raut : लोकसभेत दोन नंबरचा पक्ष, विधानसभेसाठी ठाकरेसेना दक्ष; राऊतांनी आकड्यात सांगितलं मोठं लक्ष्य

निवडणुकीत छत्रपतींचा भगवा महायुतीच फडकवेल

राज्यात दंगल करण्याची कुणाची इच्छाही नाही. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या काळात कुठेही आपल्याला दंगल झालेली दिसणार नाही. परंतु राजकीय अजेंडा राबवण्यासाठी काही धर्मियांच्या मतांवर विश्वास आला आणि ती मते टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा आहे.

मविआच्या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीतला उपस्थित नव्हते. याचा अर्थ मोठा भाऊ, छोटा भाऊवरुन त्यांचा विसंवाद किती टोकाला गेलाय हे दिसतेय. आम्ही महायुतीतील सर्व पक्ष एकत्रितपणे, ताकदीने निवडणुकांना सामोरे जाऊ आणि राज्यावर छत्रपतींचा भगवा झेंडा महायुती फडकवेलच, असा विश्वास आहे.