पाण्यासाठी शेतकरी आक्रमक, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात; पोलिस आणि रोहीत पाटील यांच्यात बाचाबाची

सांगली: जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बिरणवाडी येथे पाण्यासाठी रास्तारोको आंदोलन सुरू होते.सिद्धेवाडी तलावात विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडण्यात आले होते. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ते पुन्हा बंद करण्यात आले होते. त्यामुळे सिद्धेवाडी तलावात पुन्हा पाणी सोडावे या मागणीसाठी बिरणवाडी येथील शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले होते.गेल्या तीन तासापासून बिरणवाडीमध्ये शेतकर्‍यांनी रास्तारोको केले होते. जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत रास्तारोको मागे घेणार नाही असा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. गेल्या तीन तासांपासून सुरू हे आंदोलन सुरू होते.त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तासगाव पोलिसांनी अखेर रास्तारोको केलेल्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे बिरणवाडी-भिवघाट या मार्गावर गेल्या तीन तासांपासून रखडलेली वाहतूक आता सुरळीत सुरू झालीय.

बिरणवाडीतील आंदोलनकांना सोडण्यासाठी रोहीत पाटील यांचा पोलिस ठाण्यात ठिय्या तासगाव पोलिस आणि रोहीत पाटील यांच्यात बाचाबाची

सांगलीतील तासगाव तालुक्यातील बिरणवाडी येथे पाण्यासाठी रास्तारोको आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आक्रमक झालेल्या रोहीत पाटील यांनी तासगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मारलाय. रास्तारोको करणार्‍या आंदोलकांची तातडीने सुटका करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. आंदोलकांना सोडले नाहीतर पोलिस ठाण्यातून न हटण्याचा निर्णय देखील रोहीत पाटील यांनी घेतला. यावेळी रोहीत पाटील आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीचा देखील प्रकार घडलाय. सिद्धेवाडी तलावात विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडावे या मागणीसाठी शेतकर्‍यांनी केला होता रास्तारोको. त्यांना ताब्यात घेतल्यामुळे तासगावमधील आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.