म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरु असून अनेक ठिकाणी विजेच्या लपंडावामुळे टँकर भरताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. यावर अखेर तोडगा निघाला आहे. यासाठी राज्य सरकारकडून टँकर भरण्यासाठी सोलार पंप आणि साठवणुकीच्या टाक्या बसविण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली असून यामुळे अनेक गावांना त्याचा फायदा मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील पाण्याची उपलब्धता आणि पर्जन्यमान आढावा बैठक पार पडली. त्यात शासनाने महसूल मंत्री विखे पाटील यांच्या मागणीला मान्यता दिली असून, याची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्ह्याधिकारी यांना देण्यात आले असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे दुष्काळी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, अनेक गावांत विजेची समस्या असल्याने टँकर भरताना मोठा अडथळा निर्माण होतो. यामुळे टँकर भरण्यासाठी उशीर लागतो. पाण्यासाठी लोकांना कामधंदे सोडून ताटकळत राहावे लागले. तर उशिरा पाणी मिळत असल्याने अनेक ठिकाणी पाण्यासाठी मिळविण्यासाठी झुंबळी उसळतात.
वाड्यामध्ये मागे अशाच प्रकारे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे पाणी भरण्यासाठी सोलर पंप लावल्यास विजेचा त्रास कमी होईल आणि टँकर वेळेत भरून गावगाड्यात जातील. तसेच साठवणीच्या टाक्या असल्याने त्यात पाण्याची साठवणूक केल्यास लोकांना नळाद्वारे आवश्यकतेनुसार पाणी घेता येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील पाण्याची उपलब्धता आणि पर्जन्यमान आढावा बैठक पार पडली. त्यात शासनाने महसूल मंत्री विखे पाटील यांच्या मागणीला मान्यता दिली असून, याची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्ह्याधिकारी यांना देण्यात आले असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे दुष्काळी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, अनेक गावांत विजेची समस्या असल्याने टँकर भरताना मोठा अडथळा निर्माण होतो. यामुळे टँकर भरण्यासाठी उशीर लागतो. पाण्यासाठी लोकांना कामधंदे सोडून ताटकळत राहावे लागले. तर उशिरा पाणी मिळत असल्याने अनेक ठिकाणी पाण्यासाठी मिळविण्यासाठी झुंबळी उसळतात.
वाड्यामध्ये मागे अशाच प्रकारे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे पाणी भरण्यासाठी सोलर पंप लावल्यास विजेचा त्रास कमी होईल आणि टँकर वेळेत भरून गावगाड्यात जातील. तसेच साठवणीच्या टाक्या असल्याने त्यात पाण्याची साठवणूक केल्यास लोकांना नळाद्वारे आवश्यकतेनुसार पाणी घेता येईल.
सध्या टँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. अनेकवेळा विहिरींचा गाळ काढला नसल्याने, साफ सफाई न झाल्याने टँकरचे पाणी दूषित होण्याची भीती असते आणि असे पाणी पिल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची होऊ शकतात. पण साठवणुकीच्या टाक्यांमुळे ही समस्या सुद्धा संपुष्टात येईल आणि पाण्याचा अपव्ययही होणार नाही, असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.