तुमच्याच आशीर्वादाने सरकार सुरू, अहंकार बाळगणाऱ्यांना बाजूला करा : संजय राऊत

म.टा. विशेष प्रतिनिधी : सरसंघचालक मोहन भागवत यांना काही वाटत असेल तर त्यांनी सरकारला हटवावे. मोहन भागवत यांच्या आशीर्वादानेच सरकार सुरू आहे. जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून बाजूला काढून पहा. तुम्ही आशीर्वाद सरकारला का देताय? मोहन भागवत यांनी संघ आणि भाजपचा काही संबंध नाही, असे स्पष्टपणे सांगावे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मौन सोडत मणिपूरबाबत विधान केले. आता निवडणूक प्रचार संपला आहे. कटुता संपवा अन् मणिपूरकडे लक्ष द्या, असे मोहन भागवत यांनी म्हटले. त्यावरुन राऊत यांनी निशाणा साधला.
Sanjay Raut : लोकसभेत दोन नंबरचा पक्ष, विधानसभेसाठी ठाकरेसेना दक्ष; राऊतांनी आकड्यात सांगितलं मोठं लक्ष्य
ते पुढे म्हणाले की, शरद पवार भटकती आत्मा असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मा आहेत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अतृप्त आत्म्यांना तुम्ही समाधानी करा. भटकती आत्मा कोणाचा पिछा सोडत नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या पदावरून हटवत नाही, तोपर्यंत आमचा आत्मा शांत होणार नाही. नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागेल. ज्याप्रकारे मंत्रिमंडळ तयार केले, खातेवाटप झाले, त्यानंतर अनेक अतृप्त आत्मा पाहायला मिळतात. त्यामुळे जोपर्यंत सत्तेपासून तुम्हाला खेचणार नाही, तोपर्यंत आमचा आत्मा अतृप्त राहील आणि महाराष्ट्रात भटकत राहील.
Kolhapur News : ‘सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं…’; कोल्हापुरातील हटके बॅनरची राज्यभरात चर्चा
आता एनडीए सरकारमध्ये आम्ही मोदींना प्रश्न विचारणार नाही. तर आम्ही चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना प्रश्न विचारणार आहोत. त्यांच्या सहयोगानेच सरकार बनले आहे. त्यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी बनू शकत नव्हते. नरेंद्र मोदी यांची ही सत्ता उधारीवरची सत्ता आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांची मेहरबानी राहील तोपर्यंत ही सत्ता राहील, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यावरुन संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली होती. आताच हे कॅबिनेट ओढून ताणून बनवलेलं कॅबिनेट आहे. दोन टेकू नितेश बाबू आणि चंद्राबाबू यांचा आधार मोदींनी घेतला आहे. यंदाच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत नसल्याचं समोर आलं असून त्यांचा मुखवटा फाटला आहे. इकडून तिकडून बहुमत गोळा करुन सरकार बनवण्यात आल्याची टीका संजय राऊत यांनी केली.