ट्रेनपेक्षाही जलद होणार मुंबई ते नागपुर प्रवास, समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्यात

मुंबई : बहुचर्चित असलेला समृद्धी महामार्ग लवकरच आता मुंबईला जोडला जाणार आहे. महामार्गामुळे नागपुर आणि नाशिक प्रवास आणखी जलदगतीने होणार आहे. समृद्धी महामार्ग मुंबईला जोडण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. इगतपुरी आणि ठाणे दरम्यान असलेल्या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याव्यतिरिक्त 16 बोगदे आणि 4 भुयार निर्माण केली गेली आहे. महामार्गाला ठाणे ते इगतपुरी जोडणे थोडा कठीण आहे पण त्यासाठी रस्ता बांधकाम विभागातील तज्ज्ञांचे साह्य घेतले जात आहे.
पर्यटकांना गुड न्यूज, दीड तासात गाठा अलिबाग, कॉरिडोरचे काम वेगाने सुरुखर्डीनजीक होत असलेला ब्रीज साधारण ८२ मीटर इतका लांबीला आहे तर २७ व्या मजल्या इतका उंचीला आहे. हायवेच्या पूलाचे जवळपास ९७ टक्के काम झाले आहे. ऑगस्ट शेवटपर्यंत ब्रीज वाहतुकीसाठी खुला केला जाईल. इगतपुरी ते मुंबई दरम्यान MSRDC कडून डोंगरात बोगद्या निर्माण केला जातोय, त्याचे जवळपास काम होत आले. मुंबई ते नागपुर मधील ७०१ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी हाच रस्ता वापरला जाणार आहे.
मुंबई अहमदाबाद प्रकल्पाचा वेग वाढला, नवी मुंबईत ३९४ मीटर बोगद्याचे काम झाले पूर्ण

मुंबई नागपुर प्रवास होणार सुसाट

महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईचे अंतर अगदी सहज कापता येणार आहे. म्हणजे सध्याच्या घडीला जाणार अतिरिक्त वेळ वाचून अवघ्या सात ते आठ तासांवर प्रवास पोहचेल आणि शिर्डी सुद्धा मुंबईला आणखी कनेक्ट होईल. सध्या मुंबईवरुन फक्त शिर्डी सात ते आठ तासाचे प्रवास होत होता पण आता महामार्गामुळे प्रवास पाच तासांवर होणार आहे. समृद्धी महामार्गाला आणखी मुंबईसोबत जोडण्यासाठी भिवंडी आणि ठाण्यातील महामार्गाचे चौपदीकरण करण्याचे काम सुद्धा जलदगतीने हाती घेण्यात आले आहे.

मान्सूननंतर महामार्गाचा विस्तार

एमएसआरडीसीच्या माहितीप्रमाणे महामार्ग बराच वेळ प्रलंबित होता पण अखेर आता कामाला गती आल्याने महामार्गाच्या विस्ताराचे काम मान्सूननंतर हाती घेतले जाईल. समृद्धी महामार्गावरील नागपुर ते शिर्डी ५२० किलोमीटरचा रस्ता ११ डिसेंबर २०२२ मध्येच सुरु करण्यात आलाय. दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी ते भरवीर आणि तिसऱ्या टप्प्यातील भरवीर ते इगतपुरी महामार्गावरील रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी तयार करण्यात आलाय.