जेवायला बसलेले, जोराचा आवाज अन् घर कोसळलं, थरथर कापणाऱ्या आवाजात आसिफने सांगितला थरारक अनुभव

पुणे : वडील आंधळे, आईला चालता येत नाही… बहिणींची लग्न झालेली… घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अवघ्या दहा हजाराची नोकरी.. बुधवारी रात्री आसिफ शेख घरात कुटुंबासह जेवायला बसले. बाहेर प्रचंड पाऊस आणि संपूर्ण घर जमिनीत गाडलं गेलं. मोठा आवाज झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी सतर्कता दाखवली आणि ते घरातून बाहेर पडले, अन्यथा सर्वांना आपला जीव गमवावा लागला असता. अंगावर शहरे आणणारा थरारक अनुभव सांगताना ते थरथर कापत होते. ही घटना आहे वेल्हे तालुक्यात घडली आहे.

वडिलांना दिसेना, आईला चालता येईना, घराची जबाबदारी आसिफवर

वेल्हे तालुक्यातील धानेप गावात राहणार शेख कुटुंब. पोटापूर्ती शेती. साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी वडिलांचे डोळे गेले. आईला देखील खुब्याच्या दुखण्यामुळे चालता येईना. आसिफ आई वडिलांना एकटाच मुलगा. बहिणींची लग्न झालेली. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी आसिफवर पडली. आसिफ हा एका खाजगी कंपनीत तुटपुंज्या पगाराची नोकरी करतो. कामनिमित्त हो नोकरीच्या ठिकाणीच राहतो. आठवड्यातून एकदा तो गावी जातो. बुधवारी तो कुटुंबासमेवत घरात जेवण करण्यासातठी बसला होता. त्यावेळी घरात आई, वडील आणि एक लहान मुलगा होता.

तोंडात घास जाणार तेवढ्यात जोरात आवाज झाला. तेव्हा घर पडणार असल्याची शंका त्याला आली. त्याने तातडीने आई, वडील आणि त्या लहान मुलाला बाहेर काढले. काही क्षणात घराचा काही भाग जमिनीत गाडला गेला. वेळेत बाहेर पडले नसते तर ते सार्वजण जमिनीत गाडले गेले असते. रात्रीच्या वेळी जाणार तरी कुठे, बाहेर पाऊस पडत होता. कसे बसे गरजेपुरते कपडे घेऊन जवळच्या एका घरात या कुटुंबंने आसरा घेतला.

आमचे घर पडल्याने आमची राहण्याची सोय निघून गेली आहे. आम्हाला मदत मिळावी अशी अपेक्षा आसिफ शेख यांनी केली आहे. पडलेल्या घराचा पंचनामा देखील झाला आहे. मात्र, सरकारकडून किती मदत मिळेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आम्हाला काही तरी मदत मिळावि अशी अपेक्षा शेख कुटुंबाने व्यक्त केली आहे.