जयंत पाटील गोड बोलतात, टोकाला जायला लावू नका, आहे ते गमवाल; कदम-पाटलांना डिवचणारं रील

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल, एवढंच सांगतो, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी एका भाषणात केलं होतं. याच भाषणाचा आधार घेत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एक रील बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. यातून काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे.

विश्वजीत कदम काय म्हणाले होते?

सांगली लोकसभा निवडणुकीत बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभेत त्यांची जागा दाखवली, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं होतं. तसंच अजून बरंच काही बोलायचं बाकी आहे. ते देखील लवकरच बोलणार असल्याचं विश्वजीत कदम यांनी सांगितलं होतं. तसेच ज्यांनी करेक्ट कार्यक्रम करायचा प्रयत्न केला, त्यांचाच करेक्ट कार्यक्रम केल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं होतं.
Sudhir Mungantiwar : उद्धव ठाकरे आदित्य यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले तर…सुधीर मुनगंटीवार यांचं मिश्कील उत्तर
यावर आता जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हे रील बनवत विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनाच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सांगलीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये काय वाक्-युद्ध रंगतं हे देखील पहावं लागणार आहे.
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर माझ्या पराभवाचं कारण, शिंदेंच्या माजी खासदाराने खापर फोडलं

रीलमधून वॉर

जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील कवठेपिरान या ठिकाणी खासदार विशाल पाटील व विश्वजीत कदम यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विशाल पाटील यांनी “मी अपक्ष उमेदवार आहे, त्यामुळे या मतदारसंघात आता मी लक्ष घालणार आहे” असं म्हटलं होतं.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

तसेच यावेळेस विश्वजीत कदम म्हणाले की, दहा पटीने वाळवा मतदारसंघात आम्ही देखील लक्ष घालू, हा जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा मानला जात होता. वसंतदादा कारखान्याच्या माध्यमातून या भागामध्ये विशाल पाटील यांची पकड आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विरोधकांना पाठबळ देण्याचे काम विशाल पाटील व विश्वजीत कदम करतील, असं बोललं जात आहे