घोटाळ्यांचे आरोप, ईडी चौकशी, रवींद्र वायकर यांच्या संपत्तीत पाच वर्षांत किती वाढ?

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश करणारे माजी मंत्री रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे ठाकरेंच्या शिवेसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याविरुद्ध रवींद्र वायकर असा सामना रंगणार आहे. गेल्या पाच वर्षांत रवींद्र वायकर यांच्या संपत्तीत किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. घोटाळ्यांचे आरोप, ईडी चौकशी या कारणांमुळे चर्चेत असलेल्या वायकरांच्या संपत्ती विवरणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं.

उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवत असलेल्या रवींद्र वायकर यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये यशवंत वायकर यांच्याकडे १० कोटी १९ लाख ३६ हजार ११० रुपये इतकी जंगम मालमत्ता होती, तर ती २०२४ मध्ये वाढून १२ कोटी २० लाख ६४ हजार २९८ रुपये इतकी झाली आहे.

रवींद्र यांच्यावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल आहे. सक्तवसुली संचालनालयाची चौकशी सुरू आहे. रवींद्र आणि त्यांची पत्नी मनीषा यांच्याकडे खेड, रत्नागिरी येथे २.६४ एकर आणि १ एकर १५.८६ गुंठे जमीन या दोन जमीन संयुक्तरित्या नावावर आहे. तर मनीषा यांच्या नावावर कोर्लई, रायगड येथील ४.६७ एकर जागा असून त्याचे बाजारमूल्य २.७५ कोटी रुपये इतके आहे.
बायको गेली, दोन लेकरं वाढवतोय, चित्रा वाघ यांच्या घाणेरड्या आरोपांनी व्यथित, ‘तो’ अभिनेता हळहळला
मुंबई महापालिकेच्या मैदानासाठीचा आठ हजार चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात रवींद्र वायकर यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या कारणामुळे भाजपकडून वायकरांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले, त्यांचाच प्रचार कसा करायचा, असा सवाल भाजपकडून विचारला जात होता.
ठाकरे विरुद्ध शिंदे, भाजप विरुद्ध काँग्रेस, ४० मतदारसंघात दुरंगी लढती, कुठे काय चित्र?Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

कोण आहेत रवींद्र वायकर?

रवींद्र वायकर यांनी गेल्याच महिन्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. वायकर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. १९९२ पासून सलग चार वेळा ते मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले होते. २००६ पासून त्यांनी बीएमसीच्या स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं.

२००९ मध्ये रवींद्र वायकर यांनी विधानसभेत एन्ट्री केली. सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांना गृहनिर्माण तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री पद मिळाले. तर रत्नागिरीचे पालकमंत्रिपदही वायकरांनी भूषवले. आता त्यांना लोकसभेच्या तिकिटाच्या रुपाने बढतीची संधी मिळाली आहे.