क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ५ काँग्रेस आमदारांवर कारवाई अटळ, थेट खर्गेंकडून निलंबनाचे आदेश?

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. थेट दिल्लीतून कारवाईचे आदेश निघण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर यांच्यासह पाच आमदारांवर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

पाच आमदारांची नावे निश्चित

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के सी वेणूगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाठवले यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई महत्त्वपूर्ण बैठका पार पडत आहेत. सकाळच्या सत्रात मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये बैठक पार पडत असून त्यात क्रॉस वोटिंग करणाऱ्या संभाव्य पाच आमदारांची नावे निश्चित केल्याची माहिती मिळत आहे.

कोणाकोणावर कारवाईची टांगती तलवार?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. कारवाईचे आदेश थेट दिल्लीतून निघण्याची दाट शक्यता आहे. झिशान सिद्दीकी, हिरामण खोसकर, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
Eknath Shinde : मुंबईत विनाकारण फिरण्यापेक्षा मतदारसंघात जा; उमेदवारीचा एकच निकष, शिंदेंच्या कठोर सूचना
विधान परिषद निवडणूक निकालांत काँग्रेसची ७ मतं फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर काँग्रेसनेही अत्यंत आक्रमक भूमिका घेत फुटीर आमदारांना पक्षबाहेरचा रस्ता दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे काँग्रेस आमदारांपैकी कोण फुटले? याची सर्वाधिक चर्चा निकालानंतर लगेच रंगली होती.
NCP News : अजितदादा गटातील मंत्र्याची लेकच वडिलांविरुद्ध रिंगणात? शरद पवार गटात पक्षप्रवेशाची चिन्हं

विधानपरिषदेच्या निकालात काय झालं?

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. महायुतीचे नऊही उमेदवार निवडून आले, परंतु महाविकास आघाडीच्या तीनपैकी दोघांनाच विजयाचा गुलाल उधळता आला. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विधानपरिषदेत पोहोचल्या, परंतु काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवर ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेल्या शेकाप नेते जयंत पाटील यांची मदार होती. परंतु काँग्रेसची मतं फुटल्याने पाटील पराभूत झाले.