‘कॉपी करुन पास होणाऱ्या ठाकरेंना पारदर्शक निकाल समजला नाही’ राणेंची वायकर प्रकरणात टिप्पणी

Nitesh Rane : मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालावरुन सध्या चांगलाच वाद रंगलाय. याच प्रकरणात थेट नितेश राणेंनी आता ठाकरेंवर निशाणा साधलाय. रविंद्र वायकर यांच्या विषयावर ठाकरे गटाचा तीळपापड होतोय. नेहमी कॉपी करुन पास होणाऱ्या उद्धव ठाकरेंना पारदर्शक निकाल समजला नाही असे म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. मग महाविकास आघाडीचे ह्यांचे जिथे जिथे खासदार निवडून आले तिथे इव्हीएम हॅक झाले असे बोलायचे का? असा सवाल सुद्धा राणेंनी उपस्थित केलाय.

उद्धव ठाकरेंनी कोकणकरांची माफी मागावी राणेंची मागणी
लोकांनी शिवसेनेला नाकारलं हेच सत्य नारायण राणे साहेबांनी सांगितले त्यामुळे संजय राऊत आणि विनायक राऊत यांना मिरच्या झोंबल्या असे म्हणत ठाकरे गटाच्या कोकणातील पराभवावर राणेंनी थेट प्रहार केलाय. कोकणातला सामान्य मतदार पैसा खातो असे राऊत आणि ठाकरेंना वाटतं का? आमच्या कोकणातील जनतेचा अपमान कोण करत असेल तर कोकणची जनता त्यांना गाडून टाकते असे म्हणत राणेंनी ठाकरेंना डिवचले. उद्धव ठाकरेच्या विकास विरुद्ध प्रवृत्तीला जनतेने नाकारले सामान्य मतदारांचा अपमान करण्याचे काम उद्धव ठाकरेंचे कारटे करत आहेत असे म्हणत राणेंनी आदित्य ठाकरेंवर सुद्धा टीकेची झोड उठवली.

राणे विरुद्ध सामंत बॅनर वॉर
कोकणात मागील काही दिवस राणे विरुद्ध सामंत असे पोस्टर वॉर पाहायला मिळते. “वक्त आने दो जबाब भी देंगे हिसाब भी लेंगे” असे पोस्टर सामंत बंधूंच्या समर्थकांनी लावून राणे पिता पुत्रांना डिवचले असे अनुमान लावण्यात आले तर “बाप तो बाप होता है” असे म्हणत भाजपाने सामंत बंधूंना प्रत्युत्तर दिले. प्रत्येक पक्षात असलेल्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत त्याची दाखल घेतली असे राणे म्हणाले तर दीपक केसरकर यांनी दाखल घेतली आहे. शिंदे साहेबांच्या शिवसेनेत काही उद्धव ठाकरे प्रेमी घुसलेले आहेत त्यांना दूर करावं अशी मागणी आम्ही केली आहे असे राणेंनी पत्रकारांना सांगितले