कुठे ऊन, कुठे सुट्ट्यांचा पाऊस; मतदानाचा टक्का का घसरला? पाच कारणांतून पंचनामा

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा काल पार पडला. यापूर्वीच्या चार टप्प्यांमध्ये कमी मतदान झाल्याने राजकीय पक्षांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळालं होतं. काल झालेल्या पाचव्या टप्प्यात तरी मतदानाची आकडेवारी वाढेल असा अंदाज वर्तवला जात होता. निवडणूक आयोगाच्या यंत्रणा तशा पद्धतीने कामाला लागल्या होत्या. मात्र पाचव्या टप्प्यात सुद्धा मतदानाची आकडेवारी वाढलेली पाहायला मिळाली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी :

धुळे- ५६.६१ टक्के
दिंडोरी- ६२.६६ टक्के
नाशिक – ५७.१० टक्के
पालघर- ६१.६५ टक्के
भिवंडी- ५६.४१ टक्के
कल्याण – ४७.०८ टक्के
ठाणे – ४९.८१ टक्के
मुंबई उत्तर – ५५.२१ टक्के
मुंबई उत्तर मध्य – ५१.४२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्के
मुंबई दक्षिण – ४७.७० टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के
Lok Sabha Elections Voting : तुम्ही कुणाला मत दिलं? व्होटिंग संपताच +91 186… वरुन तुम्हालाही फोन? सर्वेक्षणाने खळबळ
मुंबईतील ६ मतदार संघांमध्ये काल सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या. मुंबईतील वातावरण ढगाळ असल्याच्या कारणास्तव मतदारांमध्ये मतदानाप्रती उत्साह दिसून आला. मात्र सकाळी १० वाजेनंतर उष्म्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळालं. परिणामी मतदार घराबाहेर पडू शकले नाहीत. अर्थात या सर्व घटकांचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून आला.
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर जाहिराती करतात, त्या प्रॉडक्टनेच बॉडीगार्डचा जीव घेतला; बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशारा

मतदानाची टक्केवारी कमी होण्याची कारणे

* शहरी मतदारांमध्ये असलेली मतदानासंदर्भात अनास्था
* सलगच्या सुट्ट्या
* वाढलेलं तापमान/उष्णता
* नियोजनाचा अभाव
* निवडणूक कर्मचाऱ्यांची कामातील दिरंगाई
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीनिमित्त अग्निपरीक्षेला सामोरे जात आहेत. काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा थेट लढती पाहायला मिळत आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झालेलं आहे. मात्र कमी मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेलं आहे.