काहींनी दहशत निर्माण केली होती, आता बारामतीमधील भीती दूर करण्याचे काम करू : सुळे

दीपक पडकर, बारामती : लोकांच्या मनातील भीती आपणाला दूर करायची आहे. बारामतीत प्रचारादरम्यान फिरत असताना बारामतीतील एमआयडीसी येथील एका कंपनीत एका महिलेच्या कुटुंबातील काही सदस्य कामाला आहेत. ती महिला मला म्हणाली की, मला तुम्हाला मतदान करायचे आहे. तुम्हाला मतदान केले तर.. एमआयडीसीतील ही कंपनी बाहेर तर जाणार नाही ना.. अशी भीती व्यक्त केली. त्यावेळी त्या महिलेला मी म्हटलं, तुम्ही कोणालाही मतदान केले तरी ही कंपनी मी कुठेही जाऊ देणार नाही, असा विश्वास दिला. या महिलेसारखीच अनेकांच्या मनात भीती आहे. ही भीती दूर करण्याचे काम पुढील काळात केले जाईल अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. खासदार म्हणून चौथ्यांदा निवड झाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांचा बारामतीकरांनी विजयी सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
Supriya Sule : सुज्ञ मतदारांनी दडपशाहीला नाकारले; सुप्रिया सुळे यांचे केंद्र सरकारवर शरसंधान

भारत हा लोकशाही देश आहे. या देशात दडपशाही चालणार नाही. या देशात लोकसभेचा लागलेला निकाल जाहीरपणे असे सांगतो की, या देशाने दडपशाही नाकारली आहे. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर उत्तर प्रदेशचे सांगता येईल. मी अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यांना विचारले की ४० खासदार कसे निवडून आणले असे विचारले. तेव्हा ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना जनतेचे दुःखच समजले नाही. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, शेतकऱ्यांच्या भावाला हमीभाव दिला नाही. बेरोजगारी, महागाई या विषयावर कोणी बोलतच नाही आणि सातत्याने भीती निर्माण केली. असेही सुळे यावेळी म्हणाला.
Baramati News : अजित पवार सोबत नसताना खडकवासला वगळता प्रत्येकमतदारसंघात लीड, शरद पवारांची जादू, सुप्रियाताईंचा चौकार

हा रडीचा डाव…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने दहा जागा लढविल्या पैकी आठ जागा आल्या साताऱ्यातील नववी जागा ही आली असती. मात्र तेथे पक्षाचिन्हाच्या साधर्म्यामुळे अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीची हक्काची पन्नास हजार मते गेली. हा रडीचा डाव आहे. या संदर्भात मी ठरवलं आहे की, याबाबत न्यायालयात व निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत. व दोन्हीपैकी एकच चिन्ह ठेवा. दोन्ही चालणार नाही. हा रडीचा डाव आहे.
Baramati Constituency: आमदारांना धोक्याची घंटा, यंदाची विधानसभा चॅलेंजिंग, लोकसभेवरुन काय निघतं भाकित?

सुडाचे राजकारण कधीही केले नाही

लोकसभा निवडणुकीच्या काळात अत्यंत वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं. असे असतानाही आपण प्रामाणिकपणे काम केलं. मात्र मी तुम्हाला विनंती करते की, निवडणुकीच्या काळात जे झाले ते झाले ते गंगेला मिळाले. महागाई, बेरोजगारी याबरोबरच विकासाची आपणाला कामे करायची आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुडाचे राजकारण कधीही केले नाही आणि आपणही कधी करणार नाही.

काही व्यक्तींनी दहशत निर्माण केली होती

बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन व्यक्तींनी मतदार संघात दहशत निर्माण केली होती. त्यांनी गावोगावी, खेडोपाडी जात कार्यकर्त्यांना धमकावण्याचे काम केले आहे. इतके दिवस मी काहीच बोलले नाही. त्यांनी जर पुन्हा एकदा आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला धमकी जर दिली. तर तुमच्या पाठीशी ठाम असेल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे व्यक्त केला.