अजित दादांचा दावा NDA ची ३०० + होईल बेरीज ‘गोळा’,  कोणत्या पक्षांना एनडीए मारताहेत ‘डोळा’

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी वर्धापन दिनी अजित पवारांनी एक मोठे भाकित वर्तवले आहे. (NDA) एनडीए सरकार आगामी अधिवेशनापर्यंत ३०० पार जाईल असा विश्वास अजित पवारांनी कार्यकर्त्यासमोर व्यक्त केलाय. सध्या देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले असून एकूण २९३ खासदार सध्या एनडीएसोबत आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभेतील खासदारांचा २७२ किंवा त्याहून अधिकचा आकडा लागतो. भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने २७२ चा आकडा पार करत सरकार स्थापन केले पण विरोधकांकडून सातत्याने सरकार अस्थिर असल्याचे म्हटले जात आहे. नेमके का असा विरोधकांकडून सूर लागतोय समजून घेवूया.

२०२४ च्या लोकसभेचा निकाल
हल्लीच झालेल्या लोकसभा निकालात देशातीन जनतेने पुर्ण बहुमत कोणाच्याच पारड्यात दिले नाही, भाजप असतील किंवा काँग्रेस असेल दोघांनी बहुमताचा आकडा गाठताना मित्रपक्षांची आणि अपक्ष खासदारांची जुळवाजुळव करुनच जमाबेरीजेने सरकार स्थापन करावे लागण्याची शक्यता निकालानंतर दिसू लागली, कारण उत्तरप्रदेश असेल किंवा महाराष्ट्र आणि अन्य राज्यात समिश्र प्रतिसाद मिळल्याने मागील निवडणुकीत बहुमताने असलेल्या भाजपला सुद्धा यंदा मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याची वेळ आली आहे. इंडिया आघाडीने (India Alliance) भाजप आणि एनडीएतील घटकपक्षांच्या विजय रथाला ब्रेक लावला आणि त्यानंतर भाजपला यंदाच्या निवडणुकीत ‘४०० पार’चा नारा देवूनही फक्त २४० जागांवर समाधान मानावे लागले, पण एनडीएच्या घटक पक्षांना काही जागांवर चांगले बहुमत मिळाले आणि एनडीएने २७२ चा आकडा पार करत सरकार स्थापन केले. पण घटकपक्षांमध्ये असलेले चंद्राबाबु नायडू किंवा नितीश कुमार यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा इतिहास पाहता एनडीए सरकार जास्त काळ टिकणार नाही असा सूर सरकार स्थापनेपासून विरोधकांनी लावलाय.
Lok Sabha Election Result 2024: अब की बार महत्प्रयासानं नय्या पार; भाजपची आता N फॅक्टरवर मदार; ‘ते’ दोघे काय करणार?

अजित पवारांते भाकित खरे ठरणार
अजित पवार गट आणि एनडीएतील मित्रापक्षांकडून सातत्याने पीएम मोदी पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करतील आणि एनडीए सरकार स्थिर राहील अशी ग्वाही दिली जाते. पण वास्तविकता खातेवाटपाटच्या वेळीच अजित पवार गटाकडून राज्यमंत्रीपदाला विरोध दर्शवत नाराजीचा सूर नमूद करण्यात आला होता. अशातच आगामी अधिवेशनात राज्यसभेवर अजित पवार गटाचे तीन खासदार जातील आणि एनडीए ३०० पार होईल असा दावा अजित पवारांनी केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा ३०० पार ची चर्चा रंगलीय.

एनडीए ‘३०० पार’ चा आकडा गाठणार
एनडीएकडे सध्या २९३ चा आकडा आहे. यामध्ये भाजप सोबत सत्तेत तेलगु देसम पार्टी(TDP) ज्यांच्याकडे १६ आहे, जनता दल युनाटिऐड(JDU) ज्याच्यांकडे १२ जागा आहेत, यासह वाय.एस.आर.काँग्रेस पक्ष(YSRCP) यांच्या चार जागा, जनता दल सेक्युलर(JD(S) यांच्या दोन जागा, पवन कल्याण यांची जनसेना पक्ष (JSP) यांच्या दोन जागा, राष्ट्रीय लोक दल(RLD) यांच्या दोन जागा, हिन्दुस्तानी अवाम मोर्चा यांची एक जागा, यूनाइटेड पीपल्स पार्टी लिबरल(UPPL) यांना एक जागा, आसाम गण परिषद(AGP) यांना एक जागा, ऑल झारखंड स्टुडंट यूनियन(AJSUP) एक जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट एक जागा, शिवसेना एकनाथ शिंदे गट ७ जागा, अपना दल (AD(S)एक जागा, लोक जनशक्ती पार्टी (LJPRV) ५ जागा, सिक्किम क्रांतीकारी मोर्चा १ जागा अश्या सगळ्या जागा मिळून एकूण एनडीएने २९३ चा आकडा गाठला आहे.
Lok Sabha Election 2024 Result : ३७० आणि ४०० पार तर सोडा; इथे भाजपला साधे बहुमत मिळण्याचे वांदे, निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी पाहून पोटात येईल गोळा

लोकसभेच्या निकालात शिरोमणी अकाली दल यांनी एक जागा लोकसभेत मिळवले आणि एमआयएम यांची एक जागा आहे ते सुद्धा भाजपसोबत जाणार नाहीत.आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) चंद्रशेखर आझाद एनडीएसोबत जावू शकतात. व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी यांच्या शिलॉग आणि मेघालयमधून दोन जागा आहेत त्यांची एनडीए सोबत जाण्याची शक्यता आहे यासह इंडिया आघाडी सोबत असलेले एकूण १३ जण तळ्यात मळ्यात भूमिकेत आहे त्यामुळे त्यांची सुद्धा एनडीएला निवड असू शकते.

लोकसभेत एकूण सात खासदार अपक्ष आहेत त्यातील सांगलीतून निवडुन आलेले विशाल पाटील यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिलाय तर उर्वरित सहा पैकी पप्पू यादव एनडीए सोबत जाऊ शकतात राजस्थानच्या पुर्णिया मतदारसंघातून निवडून आलेत. पंजाबमधील खदूर साहिबमधून निवडुन आलेले अमरितपाल सिंह विचारधारेमुळे एनडीए सोबत जाणार नाहीत.पंजाबच्या फरीदकोटमधून निवडुन आलेले सरबजीत सिंग खालसा एनडीए सोबत जाणार नाही, उमेश पटेल दमन व दीव मधून निवडुन आलेत एनडीए सोबत जावू शकतात.जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला इथून निवडुन आलेले अब्दुल रशीद शेख एनडीए सोबत जाण्याची शक्यता कमी आहे. लदाख मधून निवडुन आलेलेल मोहम्मद हनीफा सुद्धा एनडीए सोबत जाण्याची शक्यता कमीच आहे. आता शक्यता वर्तवण्यात आलेल्या लोकसभा खासदारांनी जर एनडीएला साथ दिली तर अजित पवारांनी वर्तवलेले भाकित खरं ठरुन एनडीए ‘३०० पार’चा आकडा गाठू शकते.