अजितदादांचं चॅलेंज की शरद पवारांची सहानभुती, कोल्हेंची मोठी परीक्षा, शिरुरमध्ये कोण जिंकणार?

पुणे: शिरूर लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होणार हे उद्या जाहीर होणार आहे. मात्र, अजित पवारांनी डॉ. अमोल कोल्हे यांना दिलेलं चॅलेंज पूर्ण होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे निकालाच्या अगोदर स्थानिक राजकारण चांगलेच जोर धरू लागले आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि आजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना निवडून कसा येतो हे बघतोच असे चॅलेंज दिले होते. अमोल कोल्हेंनी देखील अजित पवार यांना जशाच तसं उत्तर देत हे चॅलेंज स्विकारलं होतं. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघात दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका केली होती.
Lok Sabha Results: काका की पुतण्या? कोणाचं अस्तित्त्व टिकणार? राजकीय भवितव्य पणाला, बारामतीत धाकधूक वाढली
त्यामुळे राजकारण वेगळ्या दिशेला देखील गेल्याचे पहायला मिळाले. या मतदार संघासाठी शरद पवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यात शरद पवार यांच्या पडत्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ दिली. त्यामुळे कुठे तरी सहानभुती मिळाल्याचे पहायला मिळाले. आढळराव पाटील यांनी देखील अजित पवार यांच्या मदतीने प्रचाराची धुरा चांगली सांभाळल्याचे पहायला मिळाले. अमोल कोल्हेची पाच वर्ष आणि आढळराव पाटील यांची पंधरा वर्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नुकत्याच झालेल्या एक्झीट पोलनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे आघाडीवर असल्याचे पहायला मिळाले. तर आढळराव पाटील पिछाडीवर असल्याचे पहायला मिळाले. मात्र उद्याच्या निकालामध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिरूरमध्ये अजित दादांचे चॅलेंज जिंकणार की शरद पवारांची सहनभुती जिंकणार हे उद्याच्या निकालात स्पष्ट होणार आहे.