शरद पवारांचा डाव उलटवला, दादांचा उमेदवार वाचवला; निवडून आले नार्वेकर, शिंदे ठरले गेमचेंजर

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं नऊपैकी नऊ जागा जिंकत महाविकास आघाडीला मात दिली. मविआच्या २ जागा निवडून आल्या. शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना सेफ करत जयंत पाटील यांचा गेम केल्याचं बोललं जात आहे.

अजित पवारांच्या उमेदवाराला धक्का देण्यासाठी शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या रुपात उमेदवार दिला जात असल्याचं बोललं जात होतं. तर मिलिंद नार्वेकर ठाकरेसेनेकडून रिंगणात असल्यानं शिंदेसेनेचे उमेदवार क्रॉस व्होटिंग करतील अशीही शक्यता होती. तसं घडलं असतं तर महायुतीला धक्का बसला असता. महायुतीचा एकही उमेदवार पडला असता तर विधानसभा निवडणुकीआधी चुकीचा मेसेज गेला असता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचूक नियोजन करुन नामुष्की टाळली आणि महायुतीचे सगळे उमेदवार विजयी झाले.
MLC Election 2024: राईट हँडसाठी ठाकरेंची मिटिंग अन् गेम फिरला, नार्वेकर विजयी; ‘त्या’ बैठकीची इनसाईड स्टोरी
शरद पवारांनी लोकसभेतील यशानंतर अजित पवारांना आणखी अडचणीत आणण्यासाठी जयंत पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. अजित पवारांचा उमेदवार पराभूत झाला असता तर तो महायुतीसाठी झटका होता. पण शिंदेंनी मोठ्या शिताफीनं महायुतीचे सगळे उमेदवार सेफ केले. त्यांच्याशी वैयक्तिक संबंध उत्तम राखून असलेल्या मिलिंद नार्वेकरांचीही काळजी घेतली आणि जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम झाला.

एकनाथ शिंदेंनी महायुतीला सोबत ठेवण्याचं काम करत बेरजेचं गणित जुळवलं. महायुतीकडे २०२ आमदारांचं बळ होतं. विजयासाठी २३ मतांचा कोटा असल्यानं भाजपला पाचव्या उमेदवारासाठी ५ मतं कमी पडत होती. पहिल्या ४ उमेदवारांना कट टू कट म्हणजेच २३ मतांचा कोटा दिला असता, तर दगाफटक्याची शक्यता होती. शिवाय कट टू कट मतं ठेवली गेली असती तर ती दुसऱ्या फेरीत ट्रान्सफर झाली नसती.Nana Patole : महायुती अभेद्य, मविआला तडे; काँग्रेसची मतं कुणीकडे? नाना पटोलेंनी फुटीर आमदार ओळखले
दुसऱ्या फेरीत निवडणूक गेल्यास भाजपचे पाचवे उमेदवार सदाभाऊ खोत यांना सेफ करण्याची खेळी करण्यात आली. खोतांना पहिल्या फेरीत १४ मतं मिळाली. भाजपच्या बाकीच्या ४ आमदारांनी प्रत्येकी २६ मतं घेतली. म्हणजेच प्रत्येकाला अधिकची ३ मतं मिळाली. ही अधिकची १२ मतं दुसऱ्या फेरीत खोत यांना ट्रान्सफर झाली आणि त्यांनी विजय मिळवला.
शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला? कुणी केला? १२ मतांच्या ४ शक्यता
मिलिंद नार्वेकरांना पहिल्या फेरीत २२, तर जयंत पाटलांना १२ मतं मिळाली. म्हणजेच नार्वेकरांना विजयासाठी केवळ १ मत गरजेचं होतं. शिंदेसेनेच्या उमेदवार भावना गवळींना अधिकचं १ मत, तर कृपाल तुमानेंना अधिकची २ मतं मिळाली. त्यामुळे शिंदेसेनेकडे अधिकची ३ मतं झाली. अजित पवार गटाच्या शिवाजीराव गर्जेंना अधिकचं १ मत मिळालं. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना अधिकची २ मतं पडली. या अधिकच्या मतांपैकी एका मतानं नार्वेकरांचा विजय झाला.

मिलिंद नार्वेकरांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला. शिंदेंच्या खेळीनं तो सोपा झाला. या निवडणुकीत मविआची १२ मतं फुटली. तर अजित पवार गटाला अधिकची ५, तर शिंदेसेनेला अधिकची ३ मतं मिळाली. पक्षापलीकडे असलेले संबंध शिंदेंनी जपले आणि नार्वेकर निवडून गेले. पण यामुळे जयंत पाटलांचा गेम झाला.