कुणी उमेदवार नसेल, तर मी लढतो; फडणवीस सरकारमधील माजी मंत्री सरसावला, कीर्तिकरपुत्रास टक्कर

मुंबई : माजी राज्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. दीपक सावंत यांनी या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. अन्य उमेदवार नसेल, तर आपण तयार असल्याचे शिंदेंना सांगितल्याचे सावंत म्हणाले. प्रचारासाठी फार कमी दिवस उरले असून, संधी मिळाल्यास तिचा योग्य वापर करु, असा विश्वासही डॉक्टर दीपक सावंत यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार रवींद्र वायकर यांना मैदानात उतरवले जाणे अपेक्षित होते, परंतु त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकणी भाजप आणि मनसेच्या आक्षेपानंतर शिंदेंनी आपला निर्णय बदलला आहे. वायकर हे २०१४ ते २०१९ या काळात शिवसेना-भाजप यांच्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. वायकर विधानपरिषदेवर नियुक्त होते.

वायव्य मुंबईत उमेदवारांची चाचपणी

अभिनेता गोविंदा आणि शरद पोंक्षे यांच्यासह मराठी कलाकारांचे पर्याय पाहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी या जागेसाठी रवींद्र वायकर यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. राजकीय निरीक्षकांच्या माहितीनुसार शिंदे सेनेने किमान पाच-सहा पर्यायांची चाचपणी केली, परंतु अद्याप त्यांना उमेदवार निश्चित करता आलेला नाही.

शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले होते की अभिनेते सचिन पिळगांवकर यांचेही नाव शर्यतीत होते, परंतु त्यांनी अशा कोणत्याही चर्चा झाल्या नसल्याचे सांगत अफवा फेटाळून लावल्या. शिवसेना या जागेवर उत्तर भारतीय चेहरा नव्हे, तर मराठी उमेदवार उभा करण्यास उत्सुक आहे.
शिवसेनेचे उमेदवार भाजप ठरवतंय, एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, माजी मंत्र्याचा राजीनामा

रवींद्र वायकर नकोत

रवींद्र वायकर यांच्या नावावर भाजपचे कार्यकर्ते खूश नसल्याचे राजकीय निरीक्षकांनी निदर्शनास आणून दिले. गजानन कीर्तिकर यांनी भाजपविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे उत्तर-पश्चिम मुंबईतील राजकीय वातावरण आधीच गढूळ झाले आहे. त्यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.

कीर्तिकरांचे सुपुत्र अमोल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असून त्यांच्या नावाची घोषणा खूप आधीच करण्यात आली होती. त्यांनी प्रचारात आघाडीही घेतली होतीय मात्र खिचडी घोटाळ्यात सध्या त्यांची ईडी चौकशी सुरु आहे. वायकरांना तिकीट दिल्यास, भाजपनेच त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडीच्या चौकशीमुळे भाजप कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार करणे फार कठीण जाईल, असे एका निरीक्षकाने सांगितले.
कचाकचा बटण दाबा प्रकरणात अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट
२०१४ आणि २०१९ मध्ये गजानन कीर्तिकर भाजपच्या पाठिंब्यामुळे आणि मतदारसंघातील कामामुळे विजयी झाल्याचा भाजपला विश्वास आहे. आता त्यांच्या भाजपविरोधी वक्तव्यांनी खूप वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने वायकरांना उमेदवारी दिल्यास भाजपला मते मागणे कठीण जाईल. भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी मुद्द्याला खीळ बसेल आणि याचा परिणाम विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकांवर होईल आणि भाजपसाठी विशेषत: मध्यम आणि उच्च वर्गातील लोकांना धक्का बसेल, असे मानले जाते.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

अशा वेळी माजी मंत्री डॉ. दीपक सावंत हे रवींद्र वायकर यांच्यापेक्षा उजवे उमेदवार असू शकतात, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.