एसंशिं…! ठाकरेंचा शिंदेंना खोचक टोला; ‘औरंगजेब फॅन क्लब’वरुन इतिहास काढला, मोदींवर निशाणा

मुंबई: नरेंद्र मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना दिला आहे. महाराष्ट्रात भगवी लाट आहे. राज्यासह देशात बदल नक्की होतोय, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मुलाखतीतून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर घणाघात केला.

आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणारे राज्यकर्ते आहेत. त्यांचं काय? असा प्रश्न सामनाचे संपादक संजय राऊतांनी विचारला. त्यावर त्यांची शिवसेना म्हणजे एसंशिं… म्हणजे त्यांचं जे पूर्ण नाव आहे, ते मी पूर्ण घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात. तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे, ए सं शिंदे त्याचा फुलफॉर्म काय आहे? कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. त्यांना लाज वाटत असेल तर मी का त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ?, असा सवाल ठाकरेंनी विचारला.
वेध मतदारसंघाचा: भाजप गड राखणार, की काँग्रेस मुसंडी मारणार? वंचित, ‘एमआयएम’चे आव्हान
‘एकतर तुम्ही गद्दारी करुन राजकारणातल्या आईशी हरामखोरपणा केलात, शिवसेनेशी गद्दारी केलीत. राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना या आईच्या कुशीवर तर तुम्ही वार केलाच; पण महाराष्ट्राशीही तुम्ही गद्दारी केलीत, ती महाराष्ट्रात नाही चालणार,’ अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदेंचा समाचार घेतला.
Sanjay Raut: संजय राऊतांची भर पावसात तुफानी बॅटिंग, मोदींचा एकेरी उल्लेख, म्हणाले-देश संकटात
उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या विचारानं पुढे चाललेत. तुम्ही आता औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झाला आहात, असे ते म्हणतात. यांना वारंवार औरंगजेब का आठवतोय?, असा सवाल ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरेंनी पाकिस्तानातील केक आणि औरंगजेबाच्या जन्मभूमीची, त्यानं महाराष्ट्रावर केलेल्या हल्ल्यांची आठवण करुन दिली. ‘पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी केक खाणारे लोक मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत,’ असं ठाकरे म्हणाले.

औरंगजेबसुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता. जसे हे दिल्लीत गेले तसा औरंगजेब आग्र्यात होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी इकडे २७ वर्षे प्रयत्न करत होता. औरंगजेबानं त्यावेळी रोडशो बिडशो काही केले असतील, सभा घेतल्या असतील तर त्याची कल्पना नाही. पण महाराष्ट्र जिंकण्यासाठी तो इकडे २७ वर्षे बसला होता. पण तो पुन्हा कधीच आग्र्याला जाऊ शकला नव्हता, हे आपण लक्षात घ्यायला हवं, असं म्हणत ठाकरेंनी इतिहासाची उजळणी केली. ‘औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापण्याचं शौर्य मराठ्यांनी गाजवलं. ते मराठे, त्यांचे वंशज आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत. असं म्हणतात, मोगलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे. तसं आम्ही दोघे (उद्धव ठाकरे आणि शरद पवार) त्यांच्या खेचरांना दिसत असू,’ असं ठाकरे म्हणाले.