उबाठाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं असतं, पण…; बारणेंची खदखद, राष्ट्रवादी निशाण्यावर

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान काल झालं. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवरील मतदान पार पडलं आहे. मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. बारणे २०१४ पासून मावळमधून विजयी होत आहेत. दोन्ही निवडणुकीत त्यांनी दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे यंदा मावळमध्ये शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना असा सामना झाला. ही लढत जिंकून आपण खासदारकीची हॅट्ट्रिक करु, असा विश्वास बारणेंनी बोलून दाखवला.

मावळ मतदारसंघात येणाऱ्या सहाही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे बारणेंच्या मागे चांगली ताकद उभी राहिली. तर ठाकरेसेनेच्या संजोग वाघेरे पाटील यांची भिस्त दुसऱ्या फळीतील नेत्यांवर होती. आता बारणेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवत युतीधर्म पाळला गेला नसल्याची तक्रार केली आहे. आपण त्या कार्यकर्त्यांची नावं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवारांकडे दिली असल्याचं बारणेंनी सांगितलं.
माझा जिल्हा, माझी जबाबदारी! कोणाला दिली सुट्टी, कोणी विमानाने आले; DM राबले, १००% मतदान झाले
महायुतीच्या सगळ्या आमदारांनी चांगलं काम केलं. माझ्या मतदारसंघात दोन मोठी शहरं येतात. पिंपरी-चिंचवड आणि पनवेल यांचा समावेश मावळमध्ये होतो. चिंचवडमध्ये ३ लाख मतदान झालंय. इथे मला २ लाखांपेक्षा अधिक मतं मिळतील. पनवेलमध्ये मला १ लाख ७० हजार मतं पडतील. इथून मला ७० ते ८० हजारांचं मताधिक्क्य मिळेल, अशी आकडेवारी देत बारणेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
Jayant Sinha: ना प्रचारात सहभाग, ना संघटनेत रस; पाचवा टप्पा संपताच भाजपकडून बड्या नेत्याला नोटिस
‘विधानसभेच्या सहाही मतदारसंघांतून मला भरभरुन मतदान झालं आहे. अजित पवारांनी माझ्यासाठी सभा घेतल्या. कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. राष्ट्रवादीच्या आमदार, पदाधिकाऱ्यांना मला सहकार्य केलं. पण राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. त्यांची यादी अजित पवारांना दिली आहे. त्यांनी काम केलं असतं तर उबाठाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असतं,’ असा दावा बारणेंनी केला.

मावळमध्ये कशी लढत?
मावळमध्ये शिंदेसेनेनं श्रीरंग बारणेंना उमेदवारी दिली. तर ठाकरेसेनेनं संजोग वाघेरे यांना रिंगणात उतरवलं. बारणे २०१४ आणि २०१९ असे दोनदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. मावळमध्ये महायुतीची चांगली ताकद आहे. सहापैकी दोन आमदार भाजपचे, दोन आमदार राष्टवादीचे, तर एक आमदार शिवसेनेचा आहे. महाविकास आघाडीचा एकही आमदार मावळमध्ये नसल्यानं वाघेरेंना निवडणूक जड गेल्याचं बोललं जात आहे.